राज्यात मान्सून परतला ,पावसाचे या तारखेपासून पुनरागमन होणार ? Monsoon Withdrawal

Monsoon Withdrawal : मान्सूनने जरी राज्यातून माघार घेतली असली तरी, महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी अनुकूल हवामान तयार होत असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या राज्यात हवामान कोरडे असले तरी, १४ ते १५ ऑक्टोबरच्या सुमारास राज्यात पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

सध्याची Monsoon Withdrawal हवामान स्थिती: कोरडे वारे सक्रिय

गेल्या २४ तासांत राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे राहिले आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यात पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि कोकणातील सिंधुदुर्ग व गोवा परिसरात केवळ हलक्या पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण असले तरी, मोठ्या पावसाची शक्यता नाही.

ईशान्य मान्सूनचा प्रभाव: १४ ऑक्टोबरपासून पावसाला सुरुवात

हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतात ईशान्य मान्सून (Northeast Monsoon) सक्रिय होत आहे. यामुळे पूर्वेकडून बाष्प घेऊन येणारे वारे पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करतील. या बदलामुळे राज्यात १४ आणि १५ ऑक्टोबरच्या आसपास पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे.

हे पण वाचा:
pashudhan vima yojana जनावरांचा मृत्यू झाल्यास मिळणार 85 टक्के अनुदानाची भरपाई! pashudhan vima yojana

सुरुवातीला या पावसाचा प्रभाव राज्याच्या दक्षिण भागावर, विशेषतः कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि आसपासच्या परिसरावर अधिक असू शकतो. त्यानंतर हळूहळू राज्याच्या इतर भागांतही पावसाची शक्यता निर्माण होईल.

आज आणि उद्याचे हवामान (११-१२ ऑक्टोबर)

आज (११ ऑक्टोबर) रात्री आणि उद्या (१२ ऑक्टोबर) राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही.

  • स्थानिक ढगनिर्मिती झाल्यास कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोवा आणि बेळगावच्या सीमावर्ती भागात, तसेच गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे.
  • राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

हे पण वाचा:
Fertilizer online booking started आजपासून राज्यातील या 9 जिल्ह्यांत ऑनलाइन खतविक्री सुरू? Fertilizer online booking started

Leave a Comment