पीक पाहणी बाबत शेतकऱ्यांना दिलासा! वाचा, महसूल विभागाचा निर्णय काय? Pik Pahani

शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. खरीप हंगाम २०२५ मधील पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्व नियोजनानुसार ही मुदत सप्टेंबर अखेरीस (३० सप्टेंबर २०२५) संपली होती. आता ऑक्टोबर महिन्यात सहाय्यक स्तरावरून सर्व उर्वरित पीक पाहणी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुदतवाढीचे कारण काय?

Pik Pahani राज्यात या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली. अशा नैसर्गिक आपत्त्यांमुळे शेतकऱ्यांना पीक पाहणी वेळेवर पूर्ण करता आली नाही. या अडचणी लक्षात घेऊन, महसूल विभागाने यापूर्वीच पीक पाहणीचा कालावधी दोन आठवड्यांनी वाढवला होता. आता ही मुदत ३० सप्टेंबर रोजी संपल्याने, उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

ऑक्टोबरमधील पीक पाहणी कशी होणार?

Pik Pahani या मुदतवाढीनुसार, ऑक्टोबर महिन्यात प्रत्येक गावातील शिल्लक राहिलेल्या शेतांची पीक पाहणी पूर्ण करण्यात येणार आहे.

हे पण वाचा:
Krushi Yantrikikaran Yojana कृषी यांत्रिकीकरण योजना: ३१.६४ लाख अर्ज झाले रद्द! Krushi Yantrikikaran Yojana
  • सहाय्यक स्तरावरून पाहणी: जी शेते किंवा शेतकरी उपलब्ध नसल्यामुळे पीक पाहणी करू शकले नाहीत, त्यांची पाहणी आता सहायकामार्फत केली जाईल. विशेषतः, गावापासून दूर राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतांची पाहणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
  • दैनंदिन आढावा: सर्व सहाय्यक प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करत आहेत की नाही, याचा दैनंदिन आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  • १००% तपासणी अनिवार्य: सहायकाने केलेली पीक पाहणी योग्य आहे की नाही, याची १००% तपासणी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी करणे बंधनकारक आहे.


७/१२ उताऱ्यावर कधी होणार नोंद?

Pik Pahani शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे की, सहायकामार्फत केलेली पाहणी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्याने केलेली शंभर टक्के तपासणी ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच, मंजूर झालेली पीक पाहणी शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर प्रसिद्ध होते. त्यामुळे शंभर टक्के पीक पाहणी पूर्ण करण्याची दक्षता घेण्याचे निर्देश महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत.

या निर्णयामुळे नैसर्गिक आपत्तींमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, खरीप हंगामातील पीक पाहणीचे महत्त्वपूर्ण काम आता ऑक्टोबरमध्ये पूर्ण होईल.

हे पण वाचा:
Success Story नोकरीच्या मागे न धावता घेतला निर्णय, शेळीपालन आणि पोल्ट्री व्यवसाय केला यशस्वी, महिन्याला 3 लाख रुपयांची उलाढाल Success Story

Leave a Comment